हरतर्हेची माणसं आपल्या सभोवती असतात. आपापल्या परीनं जगत असतात.
संजीव लाटकर यांना या माणसांबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल किती विलक्षण कुतूहल असतं, ते त्यांच्या कथेतून सहज जाणवतं.
14 Mahine 13 Divas Aani Dnyaneswar Bhosale १४ महिने, १३ दिवस आणि... लेखक : ज्ञानेश्वर भोसले सोलापूरातील एका पारधी समाजातील तरुण. कायमचा गुन्हेगारी शिक्का लागलेला समाज. स्वातंत्र्याच्या ५० वर्षानंतरही परिस्थितीत फरक नाही. खूनाच्या गंभीर स्वरुपाच्या खोटय़ा आरोपाखालील ज्ञानेश्वर भोसले हा तरुण `जेलात' जातो. बहिणीच्या कल्पनातीत त्यागामुळे आणि काही भल्या माणसांच्या प्रयत्नामुळे सुटतो. आणि पारधी समाजाच्याच नव्हे तर सगळय़ा भटक्या व विमुक्त समाजाच्या विकासासाठी झटू लागतो त्याची ही आत्मकथा.
भाकडानानगल हे धरण उभं करणाया आधुनिक भगीरथपुत्रांच्या संकल्पांचं,परिश्रमांचं,त्यागाचंआणि पराक्रमाचं चित्रण करणारं गोपाल नीलकंठ दांडेकर यांचं श्ब्दशिल्प म्हणजेच आम्ही भगीरथाचे पुत्र
मेनका प्रकाशन
द्विदलच्या अपूर्व यशानंतर साहित्यिक, कवी प्रा. प्रवीण दवणे यांच्या सकस लेखणीचा हिरवाकंच आविष्कार. आयुष्यातील प्रत्येक क्षणाला सूर देणाऱ्या आनंदसाधकांच्या चिंतनाचा ललितरम्य, प्रसन्न वेध.
दिग्दर्शक राम गबाले यांनी लिहिलेली आपली जीवनकथा सांगितली आहे. "आत्मचित्र' ही कॅमेर्याच्या डोळ्यातून शब्दबद्ध झालेली वेधक, वेल्हाळ अशी पटकथाच आहे. घटना, प्रसंग, अनुभवकथन यावर दृश्यात्मकता छायेसारखी नांदते अन म्हणूनच "आत्मचित्र' वाचून संपवल्यावर अविस्मरणीय चित्रपट पाहिल्याची भावना होते.
अभोगी'चा अभ्यास करताना कथानक, व्यक्तिचित्रण, वातावरणनिर्मिती, भाषाशैली यापेक्षा प्रामुख्याने रचनापद्धतीचा विचार प्रकर्षाने करावा लागतो. कारण रणजित देसाईंच्या इतर कादंबर्यांच्या तुलनेत या कादंबरीची रचना वेगळी ईण वैशिष्ट्यपूर्ण आहे. फ्लॅशबॅक पद्धतीने कथानक उलगडत जाण्याचे तंत्र लेखकाने अवलंबले आहे. ''नियतीने लादलेल्या, काहीवेळा स्वेच्छेने स्वीकारलेल्या जीवनातल्या अपूर्णतेचा डोळस स्वीकार आणि कलेपेक्षा माणुसकी श्रेष्ठ ठरवणारा मूल्यविचार हे या कादंबरीचे प्रमुख सूत्र आहे
लोकप्रिय सांतिदूत, सुकृतपालक,कुशल संघटक,श्रेष्ठ योध्दा,शल्यचिकित्सक,संगित तज्ञ, कुलगुरु,योगी अशा विविध स्वरुपांत अगस्त्य ऋषींना आपण ओळखतो.त्यांच्या कार्याचंप्रातिनिधिक दर्शन या कादंबरीद्वारे घडवले आहे.
Aghatit Bal Phondake अघटीत बाळ फोंडके
आईवडील आणि मूल यांच्या नातेसंबंधातील भावविश्वाचं स्थान नगण्य मानून त्यांच्यातील प्रत्येकाच्या मूलभूत हक्काचंच प्रस्थ काही वेळा माजवलं जातं. पण त्यापोटी कोणावर अन्याय होत असेल, तर त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठीही तिथलीच मंडळी तत्परतेनं धाव घेताना दिसतात.
बदलत्या वास्तवाचा भेदक वेध आणि या दारुण वास्तवातही सामर्थ्यानं संघर्ष करणाया माणसाच्या दैनंदिन जगण्यातील प्रश्न,नैराश्य,हतबलता,अस्वस्थता यांचा चिंतनशील व अंतर्मुख शोध असं या पुस्तकातील कथांचं स्वरुप आहे.
Aksharspandan Nilima Gundi अक्षरस्पंदन नीलिमा गुंडी
डॉ० नीलिमा गुंडी यांचे 'अक्षरस्पंदन' हे पुस्तक प्रामुख्याने अशा समकालीन कवी आणि लेखकांच्या साहित्याविषयी आपले अनुभवकथन करते.
जीवघेण्या विमान अपघातातून अँडीज पर्वतावर 72 दिवस जिवंत राहण्याचं आश्चर्य तर घडलं, पण यातून सुटका झाल्यावरही या उतारूंना कोणत्या अनुभवांना सामोरं जावं लागलं त्याची थरारक सत्यकथा!
Ambai Sankalpana-Sampadan Kavita Mahajan Anu. Savita Damale Tutalele Pankha(Tamil) अम्बई संकल्पना-संपादन: कविता महाजन अनु. सविता दामले तुटलेले पंख (तमीळ)
Anta Na Aarambhahee Ambika Sarakar अंत ना आरंभही : अंबिका सरकार
या कादंबरीमध्ये एका स्त्रीच्या आयुष्यात विविध नात्यांनी सहवासात आलेले पुरुष आणि त्यातून उलगडत जाणारे स्त्री-पुरुष नातेसंबंधातील वेगवेगळे पैलू मांडले आहेत. नात्यांच्या प्रतिमेतून व्यक्त होणारे समाजसंस्कृतीने घडविलेले स्त्रीत्व आणि पुरुषाचे असणे यांचा परिणाम व्यक्तीच्या भावविश्वावर होत असतो. व्यक्तीचे भावविश्व घडविणे, मोडणे, नात्यांच्या चौकटीपलीकडे जाऊन तिने "स्वत्व" शोधत स्वत:चे आत्मनिर्भर भावविश्व रचणे याचा संबंध व्यक्तिगत जगण्यावर होत असतो. मानवी नात्यांच्या समाजमान्य प्रतिमा झुगारून जगण्याचा प्रयत्न करणारी "नायिका" या कादंबरीची मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे.
Antariche Bhave Bhanu Kaleअंतरीचे धावे भानू काळे
एक विशिष्ट जीवनदृष्टी व जीवनचिंतनाचा प्रत्यय देणारा अतिशय रोचक, प्रासादिक शैलीतील लेखसंग्रह.
Asa Balgandharv Abhiram Bhadakamkar असा बालगंधर्व अभिराम भड़कमकर
चरित्र कादंबरी
Asahi Priya Tendulkar असंही प्रिया तेंडुलकर प्रिया तेंडुलकरच्या निवडक सदर-लेखनाचा हा संग्रह.
Ashwada Sandhya Deshapande अश्वदा - संध्या देशपांडे आपल्या आयुष्यात घडलेल्या प्रचंड अकल्पनीय उलथापालथीला सामोरे जात असताना एक "स्त्री' म्हणून माधवीच्या मनात भावनांचे आणि वासनांचेही जे कल्लोळ निर्माण होतात तो या, कादंबरीचा गाभा आहे. संध्या देशपांडे यांनी लिहिलेली "अश्वदा' ही कादंबरी म्हणजे महाभारतातल्या ययातीची कन्या माधवी हिच्या आयुष्यातील अकल्पनीय अशी पाने आहेत.
- per page






















